पुणे मध्ये म.ग.न.रे.गा. अंतर्गत महत्त्वाचे कामे
म.न.रे.गा. (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत 266 कामांचे संयोजन पैकी 11 कामे पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने मागणी आहे. सदर कामे पुढीलप्रमाणे आहेत:
1. फळबाग विकास (फळबाग)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिलं जातं, ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. फळबाग लागवड पारंपरिक शेतीसोबत जोडल्यास, शेती अधिक शाश्वत होते.
फळबाग – १) आंबा २) काजू ३) चिकू ४) पेरु ५) डांळिब ६) संत्रा ७) मोसंबी ८) कागदी लिंबू ९) नारळ १०) बोर ११) सिताफळ १२) आवळा १३) चिंच (विकसीत जाती) १४) कवठ १५) जांभुळ १६) कोकम १७) फणस १८) अंजीर १९) सुपारी २०) बांबू २१) साग २२) जड्रोफा २३) गिरीपुष्प २४) कडीपत्ता २५) कडूलिंब २६) सिंधी २७) शेवगा २८) हदगा २९) पानपिंपरी ३०) केळी (३ वर्ष) ३१) ड्रॅगनफुट ३२) अॅव्हाकॅडो ३३) द्राक्ष ३४) चंदन ३५) खाया ३६) निम ३७) चारोली ३८) महोगनी ३९) बाभूळ ४०) अंजन ४१) खैर ४२) ताड ४३) सुरु ४४) रबर ४५) महारुख ४६) मँजियम ४७) मेलिया डुबिया ४८) तुती (मलबेरी) ४९) ऐन ५०) शिसव ५१) निलगिरी ५२) सुबाभुळ ५३) शेमी ५४) महुआ ५५) गुलमोहर ५६) बकान निब ५७) चिनार ५८) शिरीष ५९) करवंद.
फुलझाडे – १) गुलाब २) मोगरा ३) निशीगंध ४) सोनचाफा.
औषधी वनस्पती – १) अर्जुन, २) असान, ३) अशोका, ४) बेहडा, ५) हिरडा, ६) बेल, ७) टेटु, ८) डिकेमाली, ९) रक्तचंदन, १०) रिठा, ११) लोध्रा, १२) आइन, १३) शिवन, १४) गुग्गुळ, १५) बिब्बा १६) करंज.
मसाल्याची पिके – १) लवंग, २) दालचिनी, ३) मिरी ४) जायफळ, या प्रकारच्या दीर्घकालीन फळांच्या बागा, फुलझाडे , औषधी वनस्पती, मसाल्याची पिके, सलग वृक्षलागवड व बांधावरील वृक्षलागवड निर्मिती केली जाते, ज्यामुळे ग्रामीण समुदायांना शाश्वत आणि दीर्घकालीन उत्पन्न मिळते. अंमलबजावणी यंत्रणा कृषि विभाग (तालुका कृषि अधिकारी), ग्राम पंचायत (गट विकास अधिकारी)
2. गाय गोठा/ शेळी/ कुकुट पालन
प्रत्येक शेतकऱ्यांकडे आपल्या शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्याकडे गाय, म्हैस, कोंबडी, शेळीपालन केलेले असते. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, जनावरांसाठी पक्के छत किंवा शेड उभारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे .
जनावरांचे उन्हाळा ,पावसाळा ,आणि हिवाळा या ऋतूपासून संरक्षण करणे,शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन आत्मनिर्भर करणे, शेतकरी वर्गाला दुग्ध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे.
अंमलबजावणी यंत्रणा ग्राम पंचायत (गट विकास अधिकारी)
3. सिंचन विहिरी व विहीर पुनर्भरण
मनरेगा योजनेअंतर्गत शेतीसाठी सिंचन विहिरी खोदणे यांसारखी कामे करता येतात. विहिरीतील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी, विहीर पुनर्भरण (recharge) ,जलतारा या सारखी कामे हाती घेता येतात जेणेकरून पाण्याची उपलब्धता कायम राहील. अंमलबजावणी यंत्रणा ग्राम पंचायत (गट विकास अधिकारी)
4. सेरीकल्चर (रेशीम उत्पादन)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) रेशीम उद्योग विकासासाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत तुती लागवड, कीटक संगोपन आणि कोष उत्पादनासारख्या बाबींना प्रोत्साहन दिलं जात आहे. मलबेरी झाडांची लागवड आणि रेशीमच्या कोषींची पालन करणेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे ग्रामीण रोजगाराला चालना मिळते आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. अंमलबजावणी यंत्रणा रेशीम विभाग (तहसिलदार), ग्राम पंचायत (गट विकास अधिकारी)
5. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या दोन योजना एकत्र येऊन ग्रामीण भागातील लोकांना पक्के घर मिळवून देण्यासाठी मदत करतात. विशेषतः ज्यांच्याकडे घर नाही किंवा जीर्ण घरात राहतात, अशा लोकांसाठी या योजनेत सहभागी होणाऱ्या लोकांना मनरेगा अंतर्गत काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांना रोजगारासोबतच घर बांधण्यासाठी लागणारा खर्च भागवता येतो. मनरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी 90-95 दिवसांची मजुरी मिळते. यासोबतच ग्रामीण घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य देखील मिळते. अंमलबजावणी यंत्रणा ग्राम पंचायत(गट विकास अधिकारी)
6. वृक्षलागवड (बांबू लागवड, महोगणी,बिहार पॅटर्न)
बांबू लागवड ग्रामीण भागात उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच पर्यावरणीय संरक्षणासाठी मदत करते. हे जलवायू बदलावर मात करण्यासाठी एक उपाय म्हणून पाहिले जाते, कारण बांबू लवकर वाढतो. महोगणी झाडांची लागवड लाकूड उत्पादनासाठी फायदेशीर ठरते तसेच पर्यावरणीय फायदे मिळवतात. अंमलबजावणी यंत्रणा कृषि विभाग (तालुका कृषि अधिकारी), ग्राम पंचायत (गट विकास अधिकारी), सामाजिक वनीकरण विभाग (वनपरिक्षेत्र अधिकारी)
7. शोष खड्डा
मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) अंतर्गत शोष खड्डा बांधणे हे एक महत्त्वाचे काम आहे. ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता सुधारण्यास मदत करते. सोक पिट्स बांधल्याने ग्रामीण भागातील जलव्यवस्थापन सुधारण्यास, पाणी साचणे कमी करणे आणि जलस्रोतांचे संवर्धन होण्यास मदत होते.अप्रवाहित जल व्यवस्थापनासाठी आणि भूजल पुनर्भरणासाठी शोष खड्डा (जल शोषक गड्डा) बांधणे. यामुळे स्वच्छतेत सुधारणे आणि जलजन्य रोगांचा धोका कमी होतो. अंमलबजावणी यंत्रणा ग्राम पंचायत (गट विकास अधिकारी)
8. रस्ता बांधकाम
यामध्ये पक्के रस्ते, आंतरिक गाव रस्ते आणि संबंधित पायाभूत सुविधा जसे साईड ड्रेन्स आणि कालवे यांचा समावेश होतो. ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम केले जाते ज्यामुळे न जोडलेल्या गावांना व ग्रामीण उत्पादन केंद्रांना सर्व हंगामातील कनेक्टिव्हिटी मिळवता येते. अंमलबजावणी यंत्रणा ग्राम पंचायत (गट विकास अधिकारी)
9. रोपवाटिका (नर्सरी स्थापनेचे काम)
झाडांची लागवड करण्यासाठी रोपवाटिका स्थापन केले आहे. हे काम जंगल संवर्धन, माती जतन आणि जलव्यवस्थापनासाठी महत्त्वाचे आहे, तसेच ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये योगदान देणारे आहे. अंमलबजावणी यंत्रणा सामाजिक वनीकरण विभाग (वनपरिक्षेत्र अधिकारी), वन विभाग (वनपरिक्षेत्र अधिकारी)
10. वैयक्तिक गृह शौचालय निर्माण (IHHL)
ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेसाठी शौचालयांच्या बांधकामाला प्रोत्साहन देणे, ज्यामध्ये घरातील शौचालय, शाळा शौचालये आणि सामुदायिक स्वच्छता युनिट्स यांचा समावेश आहे. अंमलबजावणी यंत्रणा ग्राम पंचायत(गट विकास अधिकारी)
11. नाडेप कंपोस्ट /वर्मीकंपोस्ट (वर्मी कंपोस्ट)
जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नाडेप कंपोस्ट पिट्स बांधणे, जे मातीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि स्वच्छ ग्रामीण भागात पर्यावरणास प्रोत्साहन देतात. तसेच वर्मी कंपोस्ट युनिट्सच्या स्थापनेस प्रोत्साहन देणे, जे मातीची उत्पादकता वाढवते आणि टिकाऊ (सस्टेनेबल) शेतीला प्रोत्साहन देण्यात येते. अंमलबजावणी यंत्रणा कृषि विभाग (तालुका कृषि अधिकारी),