बंद

आम आदमी विमा योजना

| क्षेत्र: सामाजिक न्याय विभाग

आम आदमी विमा योजना

लाभार्थी:

ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.

फायदे:

या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांच्या वारसास / लाभार्थ्यास रक्कम देण्यात येते. नैसर्गिक मृत्यू - रु. 30,000/- अपघाती मृत्यू - रु.75, 000/- अपघातामुळे कायमचे अपंग - रु.75, 000/- अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास - रु.75, 000/- अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास - रु.37, 500/- या योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते.

अर्ज कसा करावा

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.. संपर्क कार्यालयाचे नाव-जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

किंवा भेट द्या https://aaby.mahaonline.gov.in/HOME/index.aspx